मयताच्या कुटुंबाला मदत देण्याची मागणी

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील नांदगाव गावात राहणारे रुपेश सुरेश मळेकर यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. या घटनेला एक वर्षाचा अधिक कालावधी लोटला असून सुद्धा मयत कुटुंबाला वीज मंडळाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. वीज महावितरण कंपनी कडून त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुरुड तालुका भाजप उपाध्यक्ष स्वप्नील श्याम चव्हाण यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. याबाबत त्यांनी रायगड जिल्हाधिकारी याना मेल द्वारे आपली कैफियत मांडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विनंती केली होती. त्यांच्या या पत्राची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन रायगड जिल्ह्याच्या निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. पदमश्री बैनाडे यांनी मुरुड येथील उप कार्यकारी अभियंता यांच्याकडून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश बजावले आहेत.

Exit mobile version