महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पथदिवे चालु करण्याची विजवीतरण विभागाकडे मागणी
पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
सुधागड तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून रस्त्यांना प्रकाशमय करणारे पथदिवे बंद अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळेस वाटसरू व वाहनचालकांना अत्यन्त उपयुक्त ठरणारे पथदिवे चालु नसल्यामुळे अडचणी येत आहेत. सुधागड तालुक्यातील हे पथदिवे चालु करावेत अशी महत्वपूर्ण मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाली सुधागड विजवीतरण विभागाकडे केली आहे. या मागणीचे निवेदन पाली महावितरण कार्यकारी उपअभियंता जतीन पाटिल यांना सोमवारी दि.(9)रोजी देण्यात आले. पथदिवे बंद असल्याने सर्व रस्ते अंधारमय झाले आहेत.
नुकताच श्रावण महिना चालु झाला आहे. याबरोबरच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोकणातील लोकप्रिय सण असलेले गणपती व गोकुळाष्टमी हे सण येत आहेत. पथदिवे चालु नसल्यामुळे साप, विन्चू , कीटक जंतू आदीच्या दंशाने जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तसेच अंधारात चोरीचे प्रमाण सुद्धा वाढू शकत, पथदिवे चालू असल्यास नागरिकांना सुरक्षेचे दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. याचा विचार करता पथदिवे लवकरात लवकर चालु करण्यात यावे अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलीय. सदर मागणीची तात्काळ दखल घेऊन जलदतेने कार्यवाही केली जाईल असे जतीन पाटील यांनी आश्वाशीत केले. यावेळी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे , विभाग अध्यक्ष केवळ चव्हाण , पाली शहर अध्यक्ष अंकुश चोरघे , चव्हाणवाडी शाखा अध्यक्ष परेश वनगळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.