। पाताळगंगा । वार्ताहर ।
तळवली येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल मालकर यांच्या पत्नी अश्विनी यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद शाळा तळवली येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणामध्ये गोडी निर्माण व्हावी, शिवाय शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांची घरची स्थिती बिकट असते. यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा या उद्दात हेतूने वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण, शिक्षका मंगल मुंढे, लक्ष्मी जाधव, मंजुळा वाघे आदी मान्यवर उपस्थित होते.