आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

| चिरनेर | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील कासारभट येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या आदिवासी बांधवांना मुंबई येथील आकाश फाऊंडेशनच्या सचिव संजीवनी शृंगारे यांच्या वतीने कपडे, खाऊ, खेळणी, ब्लँकेट, चप्पल आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदाबहार दोस्ती ग्रुप तसेच सारडे विकास मंचाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हरिश्चंद्र म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, कैलास पाटील, तृप्ती पाटील, तुकाराम गावंड, संतोष जोशी, वैशाली जोशी, विजय गावंड, विजया गावंड, जितेंद्र म्हात्रे, मीना म्हात्रे, सचिन पाटील, ममता पाटील, कामेश्वर म्हात्रे, निवास गावंड, सचिन पाटील, शंकर पाटील, नागेंद्र म्हात्रे, रुपाली म्हात्रे, स्नेहीत पाटील आदींचे सहकार्य लाभले.

Exit mobile version