बेईमान लोकांच्या डोक्यावर हात ठेऊ नका

आ. जयंत पाटील यांची शरद पवार यांना विनंती

| श्रीवर्धन | माधवी सावंत |

सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत काम करणारा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना नावाने ओळखणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे शरद पवार आहेत. शरद पवार यांनी पहिली कर्जमाफी केली आणि मुख्यमंत्री अंतुले यांनी दुसरी केली. काही लोकं केलेले उपकार विसरून जातात. त्यामुळे बेईमान लोकांच्या डोक्यावर हात ठेऊ नका. आता काळ बदलला आहे. आपण नव्याने सुरुवात करुया, अशी विनंती आ. जयंत पाटील यांनी शरद पवार यांना केली. रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या श्रीवर्धन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.



यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते, आ. अबु आझमी, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी खा. हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडीत पाटील, माजी. आ. बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Exit mobile version