भारतासाठी करो या मरो; सेमी फायनलसाठी विजयाची गरज

झिम्बाब्वेविरुद्ध साखळीतील शेवटचा सामना

| मेलबर्न | वृत्तसंस्था |

भारत आणि झिम्बाब्वे या दोन उभय संघात उद्या रविवारी टी-20 विश्‍वचषकाच्या साखळी सामन्यातील शेवटचा सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे. भारतासाठी हा सामना करो या मरो असा आहे. कारण, जर भारताला टी-20 विश्‍वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना हा सामना जिंकावा लागेल. कारण, या सामन्यात पराभूत झाल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

टी-20 विश्‍वचषकातील समीकरण बदलत आहे. भारतीय संघ सध्या त्यांच्या गटात सहा गुणांसह अव्वल स्थानावर असून, रविवारी होणारा हा सामना भारतीय संघाच्या उपांत्य फेरीतील सामन्याचे भवितव्य ठरवेल. सद्यःस्थितीत नेट रनरेटच्या बाबतीत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ भारताच्या पुढे आहेत. पण, जर पाऊस पडला तर भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. सध्याच्या घडीला भारताचे सहा गुण आहेत आणि त्यांना एक गुण मिळाला तर त्यांचे सात गुण होतील. पण, त्यामुळे पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. कारण, पाकिस्तानने त्यांचा अखेरचा सामना जिंकला तरीही त्यांचे सहा गुण होतील आणि त्यांच्यापेक्षा जास्त भारताचे असतील. त्यामुळे पाऊस हा भारताच्या पथ्यावर पडू शकतो.

भारताचा या सामन्यात पराभव झाला तर त्यांचे सहाच गुण राहतील आणि त्यांना रनरेट तर कमीच आहे. या परिस्थितीत जर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांनी जर आपले अखेरचे सामने जिंकले, तर ते सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतात व भारताचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे आता भारताचे आव्हान या विश्‍वचषकात टिकणार की नाही ही गोष्ट झिम्बाब्वेच्या सामन्यार अवलंबून असेल. त्यामुळे हा सामना भारताने जिंकला तर या सर्व गोष्टीचा विचारच टीम इंडियाच्या चाहत्यांना करावा लागणार नाही. त्यामुळे झिम्बाब्वेवर भारताने विजय साकारला तर ते सहजपणे सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतात.

Exit mobile version