। चिपळूण । प्रतिनिधी ।
खो-खो स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात उपांत्य फेरीचे सर्वच सामने रंगतदार झाले. खेळाडूंचा वेगवान खेळ प्रेक्षकांची दाद मिळवून गेला. 14 वर्षांखालील मुलींच्या गटात राजमाता आहिल्यादेवी (सांगली) संघाने आर्यन (रत्नागिरी) चा एक डाव पाच गुणांनी पराभव करत विजेतेपद मिळविले.
विद्या तामखडे नाबाद 3 मिनिटे व दोन गडी, आरती तामखडे 4 मि.10 सेकंद व 1 गडी अशी अष्टपैलू कामगिरी केली. आर्यन संघाकडून मृण्मयी नागवेकर 1 मि. 10 से., 1 मि. 20 से. खेळ केला. 18 वर्षांखालील मुलींच्या गटात वॉरिअर्स स्पोर्ट्स (सांगली)ने आर्यन (रत्नागिरी) संघावर एक डाव 4 गुणांनी विजयी मिळविला व गटाचे विजेतेपद मिळविले. मुलांच्या 14 वर्षांखालील वयोगटात विहंग (ठाणे) संघाने फादर अॅग्नेल संघावर 20 सेकंद राखून निसटता विजय संपादन केला. आशिष गौतम याने 4 मि.10 सेकंद नाबाद 5 मि. खेळ करीत स्पर्धेवर छाप टाकली.
मुलांच्या 18 वर्षांखालील गटात महात्मा गांधी (मुंबई उपनगर) संघाने छत्रपती क्रीडामंडळ (रत्नागिरी) संघाचा 2 गुण व 6 मि. राखून पराभव केला व स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले. धीरज भावेने दोन्ही डावात 2 मि. सरंक्षण केले. सुजल जयगडेने 2 मि. 20 से. आणि 1 मि. 30 से. सरंक्षण केले. आशिष गौतम, धनश्री तामखडे, यश बोरावडे, सानिका निकम यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.