शेतकर्‍यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा

। कोर्लई । वार्ताहर ।
शासनाच्या कृषी विभागांतर्गत येत्या खरीप हंगामामध्ये संन 2022-23 या सत्रात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असून या योजनेचा मुरुड तालुक्यातील शेतकर्‍यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांनी केले आहे. या योजनेत अनुसूचित जाती, अनुचित जमाती, ’भटक्या जमाती, निराधिसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमातीचे शेतकरी सहभागी होऊ शकतात.


या योजनेंअर्गत शेतकरी आंबा, काजु, चिकू, पेरू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, बांबु, साग, जाड़ोफा, गिरीपुष्प, कडीपत्ता, कडुलिंबू, सिंधी, शेवगा, हादगा, केळी, ड्रॅगनफ्रूट, द्राक्ष, चंदन, गुलमोहर, करवंद, मँजियम, ताड़, खैर, बाभुळ, सुबाभुळ, गुलमोहर इत्यादी अशा प्रकारे 59 फळपिकांची लागवड करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, जॉब कार्ड, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमध्ये मोडत असल्यास जातीचा दाखला, आधार या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकर्‍याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे, तसेच या योजनेंतर्गत फळबाग लागवाडीसाठी कमीत कमी 0.05 हेक्टर व जास्तीत जास्त 2 हेक्टर प्रतिलाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. सादर योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थी इच्छुक लाभधारकांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे, तसेच सदरील जमीन कुळ कायाद्याखालील येत असल्यास 7/12 वर कुळाचे नाव असेल, तर सदरील योजना राबवीत असताना कुळाची संमती घेणे गरजेचे राहील. कार्ड, व बँकेचे पास बुक अर्जासोबत जोडून ग्रामपंचायत कार्यालय किवा कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर करावे. पारंपरिक शेती न करता शेतकर्‍याने आधुनिक पद्धतीने फळबाग लागवड करून आपल्या शेतीचे उत्पादन वाढवावे, असे आवाहनही तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांनी केले आहे.

Exit mobile version