। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महान वाडी रामराज येथे गावातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी शेकाप युवा संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे यांच्या प्रयत्नाने गावासाठी 40 हजार लिटरची टाकी बांधून देण्यात आली.
गावात पाण्याची टंचाई आहे याची ग्रामस्थांनी विक्रांत वार्डे यांच्याकडे समस्या सांगितली होती.त्यांनी तात्काळ माजी आ.पंडित पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पं.स.माजी सभापती प्रमोद ठाकूर यांच्याकडून सदर टाकी मंजूर करून घेतली.
टाकीचे काम चांगले व्हावे या हेतूने कंत्राटदार नवनीत पाटील आणि रमेश पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आणि अवघ्या दीड महिन्यात टाकी पूर्ण केली.या टाकीचे उदघाटन पंडित पाटील,माजी प्रमोद ठाकूर, .प्रिया पेढवी,युवा अध्यक्ष विक्रांत वार्डे आदींच्या उपस्थित करण्यात आले.यावेळी सरपंच हिराजी काष्टे, मोहन धुमाळ, नौशाद मुजावर, गिरीश तेलगे, सुधीर पाटील, महेश झावरे, नंदकुमार चिखले, नरेश भांडविलकर, गणेश कानोजे, युवा कार्यकर्ते अनुराज चिखले, राहुल पवार, संकेत धनावडे, विकी भांडविलकर, ऋषिकेश धनावडे, रोहन धनावडे, आणि शेकाप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.