नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी शब्द पाळला
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली परिसरात असलेल्या गॅस शवदाहिनी वरील पत्रे जीर्ण झाले आहेत, ते पत्रे पावसाळ्यापूर्वी बदलले नाही तर शवदाहिनी मशीनवर पाणी पडून शवदाहिनी बंद पडण्याच्या शक्यता निर्माण झाली होती. यावेळी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी जीर्ण पत्रे पावसाळा सुरू होण्यापूर्वी बदलेले जातील असा शब्द दिला होता तो त्यांनी तो पाळला गॅस शवदाहिनी जीर्ण पत्रे बदलले आहेत.
कर्जत नगरपरिषद क्षेत्रात येणार्या मुद्रे, गुंडगे, भिसेगाव, कर्जत, दहिवली अशा अनेक ठिकाणी स्मशानभूमी आहेत, मात्र या ठिकाणी स्मशानभूमीत लाकडांचा वापर करून अंत्यविधी केले जातात सध्या लाकडांची कमतरता पाहता अंत्यविधीसाठी लाकडे उपलब्ध होत नाही. हे ओळखून कर्जत नगर परिषद व मुंबई मेट्रोपोलिटन रिजनचे इन्व्हायरमेंट इम्प्रुमेंट सोसायटी मार्फत गॅस वर आधारित शवदाहिनी 3 मार्च 2013 रोजी कर्जत नगरपरिषद क्षेत्रासाठी लोकार्पण करण्यात आली होती.
नगरपरिषद क्षेत्रातील असलेल्या स्मशान भूमीत लाकडांची कमतरता भासत असल्याने दहिवली येथील गॅसवर आधारित असलेल्या शवदाहिनीकडे अंत्यविधी करण्याचा कल वाढला आहे, मात्र या स्मशानभूमीतील शववाहिनीची दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. शवदाहिनी मशीन असलेल्या शेडचे पत्रे नऊ वर्षांमध्ये जीर्ण झाले आहेत ते या पावसाळ्यापूर्वी बदलणे गरजेचे आहे अन्यथा जीर्ण झालेल्या पत्रातून पाणी पडून शवदाहिनी मशीन बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे या पावसाळ्यापूर्वीच शवदाहिनीच्या शेडवरील जीर्ण झालेले पत्रे बदलणे गरजेचे आहे. या मथळ्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. वर्तमान पत्रातील बातमी बघून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे पत्रे बदलले जातील असा शब्द पत्रकारांना दिला होता. त्याप्रमाणे दहिवली येथील गॅस शवदाहिनीवरील जीर्ण पत्रे बदलले आहेत त्याची पाहणी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी केली.