अमरावती हिंसाचारप्रकरणी सरकारकडून एकतर्फी कारवाई

फडणवीस यांचा आरोप
अमरावती | प्रतिनिधी |
अमरावती हिंसाचारप्रकरणी राज्य सरकारकडून एकतर्फी कारवाई होत आहे. यामध्ये 12 नोव्हेंबर रोजी घडलेलं त्रिपुरातील फेकन्यूज प्रकरण डिलीट करुन 13 तारखेला अमरावती हिंसाचारप्रकरणी ज्यांचा याच्याशी संबंध नाही अशा हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस रविवारी अमरावतीला दौर्‍यावर आले होते. सकाळी शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहाणी केली. हनुमाननगर, मसानगंज या भागाची तसेच खासगी रुग्णालयाची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिक आणि व्यापार्‍यांशी देखील चर्चा केली. त्यानंतर अमरावतीच्या विभागीय कार्यालयाला जाऊन अधिकार्‍यांशी देखील चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत हिंसाचारप्रकरणावर भाष्य केलं.

Exit mobile version