14 वर्षांनंतर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक
| शांघाय | वृत्तसंस्था |
भारताच्या तिरंदाजांनी शांघाय येथे पार पडलेल्या विश्वकरंडकात इतिहास रचला. धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय व प्रवीण जाधव या भारतीयांनी ऑलिंपिक विजेत्या दक्षिण कोरियाच्या खेळाडूंना पराभूत करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताने रिकर्व्ह प्रकारात 14 वर्षांनंतर सुवर्णपदकावर मोहर उमटवली हे विशेष.
भारतीय तिरंदाजांनी तिरंदाजी विश्वकरंडकातही देदीप्यमान यश संपादन केले. पाच सुवर्ण, दोन रौप्य व एक ब्राँझ अशा एकूण आठ पदकांची माळ आपल्या गळ्यात घालताना भारतीय खेळाडूंनी बाजी मारली. अखेरच्या दिवशी पुरुषांनी रिकर्व्ह प्रकारातील सांघिक विभागात सुवर्णपदक जिंकतानाच दीपिकाकुमारीने रिकर्व्ह प्रकारातील महिलांच्या वैयक्तिक प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. अंकिता भकत व धीरज बोम्मादेवरा या जोडीने रिकर्व्ह प्रकारातील मिश्र विभागात ब्राँझपदकावर नाव कोरले.
सुवर्णपदकापासून दूर दीपिकाकुमारी ही भारताची अनुभवी नेमबाज आहे. तिच्याकडे सुवर्णपदक जिंकण्याची सुवर्णसंधी होती. दीपिकाकुमारीने उपांत्य फेरीच्या लढतीत नाम सुहयिओन हिच्यावर 6-0 असा विजय संपादन केला. लिम हिने पहिला सेट 27-26 असा, दुसरा सेट 29-27 असा आणि तिसरा सेट 28-27 असा जिंकला व पहिले स्थान मिळवले. दीपिकाकुमारीने रौप्यपदक जिंकले.