। सुतारवाडी । हरिश्चंद्र महाडिक ।
जुनच्या सुरवातील दडी मारुन बसलेल्या पावसाकडे शेतकर्यांचे डोळे लागलेले असताना दिनांक 4 जुलैपासून दुपारनंतर पावसाने तूफान पर्जन्यवृष्टी केल्यामुळे रोहा तालुक्यातील शेतकरी सुखावला. मात्र आता सुतारवाडी येथील धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सतत पडणार्या पावसामुळे सुतारवाडी येथील धरण त्याचप्रमाणे परिसरातील लहान नद्या, नाले अगदी ओसंडून वाहत आहेत. रोहा शहरात मात्र साचलेल्या पाण्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.