भारतीय खेळाडूंचा सराव सुरू


किवींच्या मनात भरली धडकी
। लंडन । वृत्तसंस्था ।
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसीची मानाची ट्रॉफी जिंकण्यासाठी उत्सुक आहे. आकडेवारीनुसार विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असला तरी त्याला अद्याप आयसीसी एकही प्रमुख स्पर्धा जिंकता आलेली नाही. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून टीम इंडियाला हार मानावी लागली. आता ती चुक कसोटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये विराट कदापी होऊ देणार नाही आणि जेतेपदाचा दुष्काळ संपवेल. चार महिन्यांच्या लंडन दौर्‍यासाठी बीसीसीआयने 20 सदस्यीय संघ जाहीर केला आणि त्यांच्यासोबत 4 राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया प्रथमच परदेशात खेळणार आहे.

18 ते 23 जून या कालावधीत रंगणार्‍या कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये कोणत्या 11 खेळाडूंना खेळवायचे, यासाठी विराट आतापासून विचार करत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, आर अश्‍विन, रवींद्र जडेजा ही नावे अंतिम 11मध्ये पक्की मानली जात आहेत. पण, उर्वरित दोन जागांसाठी 11 उमेदवारा आहेत आणि त्यातून छाननी करणे संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. पण, भारतीय संघाकडे एकापेक्षा एक सक्षम पर्याय आहेत. लंडनमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंनी गुरुवारी सरावाला सुरूवात केली. बीसीसीआयनं खेळाडूंच्या नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात भारतीय खेळाडूंचा आत्मविश्‍वास पाहून न्यूझीलंड संघाचे टेंशन नक्की वाढले असेल.

Exit mobile version