| मुंबई | प्रतिनिधी |
जेएनपीटी ते दिल्ली या दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचा पहिला टप्पा या वर्षी पूर्ण होईल, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
मुंबईतील आर.डी. अँड एस.एच. नॅशनल कॉलेज व एस.डब्ल्यू.ए. विज्ञान महाविद्यालय येथे सेंद्रिय उद्यानाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. यावेळी दिल्ली ते जेएनपीटी या पहिल्या टप्प्याचे काम याच वर्षी पूर्ण होईल, असे ते म्हणाले. नरीमन पॉईंटला दिल्लीशी जोडून हा प्रवास 12 तासांचा करण्याची आपली योजना आहे, असे त्यांनी सांगितले.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या कामगिरीविषयी गडकरी यांनी सांगितले. देशातील सुमारे एक कोटी लोक सायकल-रिक्षा चालवतात हे जाणून मला दुःख झाले. त्यांच्यापैकी 80 लाख लोक आज ई-रिक्षा चालवत आहेत. देशातील 400 स्टार्ट-अप इलेक्ट्रिक स्कूटर, ई-रिक्षा इत्यादी बनवत आहेत. हरित इंधनाच्या महत्त्वाचा पुनरुच्चार गडकरी यांनी केला. रस्ते वाहतूक मंत्रालय सन 2000 पासून ऊर्जा क्षेत्रात शेतीचे वैविध्यीकरण करून ऊर्जा क्षेत्रासाठी वापराबाबत काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही उसापासून इथेनॉलसारखे हरित इंधन निर्मिती करत आहोत जे किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी असून त्यामुळे इंधनाची आयात कमी करण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. नैतिकता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण हे आपल्या समाजाचे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत. या कार्यक्रमाला हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.