• Login
Monday, March 27, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

पंडितांचा राग

Varsha Mehata by Varsha Mehata
January 3, 2023
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मोदी सरकारचे निर्णय तांत्रिकदृष्ट्या योग्य असू शकतात. कायदेशीर ठरवले जाऊ शकतात. न्यायालयांकडून तसे शिक्कामोर्तब करून घेतले जाऊ शकते. पण म्हणून, त्या निर्णयांचे जे भयंकर परिणाम होत असतात त्यावर पडदा टाकला जाऊ शकत नाही. नोटबंदीचा निर्णय सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला. मात्र त्याच्या दुष्परिणामांची चर्चा टाळली गेली. 370 वे कलम रद्द करून जम्मू-काश्मीरला केंद्रशासित करण्याबाबतच्या याचिकांची अजून सुनावणी सुरू झालेली नाही. न्यायालय उद्या कदाचित तोही निर्णय वैध ठरवू शकेल. पण तसे झाले तरीही या निर्णयानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये काश्मिरातील स्थिती वेगळ्या रीतीने चिघळली आहे हे झाकले जाऊ शकत नाही. आजवर दहशतवाद्यांच्या गोळ्यांना हिंदू व मुस्लिम दोघेही सारखेच (किंबहुना, मुस्लिम अधिक संख्येने) बळी पडत होते. दहशतवादी मुसलमान असले तरी हा मुख्यतः भारत विरुध्द पाकिस्तान असा संघर्ष होता. पण 370 वे कलम हटवल्यापासून त्याला हिंदू विरुध्द मुस्लिम असे स्वरुप देण्याचा प्रयत्न चालू आहे. मोदी सरकार तर या प्रश्‍नाकडे त्याच चष्म्यातून पाहत असते. बाहेरच्या हिंदूंना आणून येथे वसवण्याचा त्यांचा प्रकल्प आहे. आता दहशतवाद्यांनीही हाच चष्मा घातला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील हिंदू नागरिकांच्या वेचून चाललेल्या हत्या या त्याच्याच निदर्शक आहेत. रविवारी आणि सोमवारी चौदा तासांच्या अंतरात राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात दोन हल्ल्यांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे एक हजार वस्तीच्या या गावातील बहुसंख्य लोक हे हिंदू आहेत. ज्या दीपक शर्मांच्या घरावर रविवारी हल्ला करण्यात आला ते गणितातील द्विपदवीधर होते व पुढील आठवड्यात लष्करी नोकरीत रुजू होणार होते. ते या गोळीबारात मारले गेले. दुसरे सतीश शर्मा हेदेखील माजी लष्करी कर्मचारी होते व सध्या मुंबईत सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. शर्मांच्या घराच्या अंगणात बाँब लावून ठेवण्यात आले होते. त्यांचा सोमवारी स्फोट होऊन दोन मुले मारली गेली. शर्मांच्या घरी सांत्वनाला येणारे गावकरी वा तपासाला येणारे पोलिस अधिकारी यांना मारण्यासाठी ही स्फोटके ठेवण्यात आली होती असा अंदाज आहे. पंधराच दिवसांपूर्वी जवळच्याच खेड्यात अतिरेक्यांनी भारतीय सेनेच्या ठाण्याच्या जवळ दोन जणांना मारले होते. त्यावेळी लष्करी तळावरही ग्रेनेडचा हल्ला करण्यात आला होता. साहजिकच प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यावर लोक संतापलेले आहेत. रविवारच्या घटनेनंतर शर्मा कुटुंबातील मारले गेलेल्यांचे मृतदेह गावाच्या चौकात ठेवून त्यांनी आंदोलन केले. या निमित्ताने स्थानिकांनी स्थापन केलेल्या संरक्षण समित्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला. अतिरेक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी या समित्यांची स्थापना करण्यात आली होती व त्यांना शस्त्रे बाळगण्याची परवानगी होती. पण मध्यंतरी तिचा दुरुपयोग झाल्याने समित्या बरखास्त केल्या गेल्या. रविवारच्या हल्ल्याच्या वेळी लोकांनी लपवून ठेवलेली शस्त्रे वापरून अतिरेक्यांवर प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्याने मोठी घटना टळली असे स्थानिकांचे म्हणणे पडले. त्यामुळे आता या समित्या पुन्हा स्थापन होणार आहेत. एकूणच काश्मिरातील हिंसाचार हे किती गुंतागुंतीचे प्रकरण आहे याचा अंदाज या सर्व घटनाक्रमावरून यावा. जम्मूमधील पूंछ आणि राजौरी हे जिल्हे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. त्यांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात काश्मिरात 26 जवान आणि 172 दहशतवादी ठार झाले. शिवाय सरकारी कर्मचार्‍यांवर 29 हल्ले करण्यात आले. हे बहुतेक हल्ले हिंदूंवर आणि बाहेरच्या राज्यातून आलेले मजूर, व्यावसायिक इत्यादींवर झाले. साहजिकच गेल्या वर्षभरात त्यांनी मोठ्या प्रमाणात पलायन केले आहे. बाहेरच्या हिंदूंनी काश्मिरात स्थायिक होण्याचा वा येथे जागा खरेदी करण्याचा प्रयत्न करू नये अशा धमक्या दिल्या जात आहेत. मोदी सरकार आणि त्यांनी नियुक्त केलेले आजवरचे राज्यपाल हे सरळसरळ हिंदूंचे पक्षपाती राहिलेले आहेत. 370वे कलम म्हणजे काश्मिरी मुस्लिमांचे लांगूलचालन करण्याचा प्रकार होता अशी या सरकारची भूमिका होती. त्यामुळे ते हटवले गेल्यानंतर काश्मिरातील हिंदू जनता मोदींवर निहायत खूष असायला हवी होती. प्रत्यक्षात दहशतवाद्यांनी नव्याने लक्ष्य केल्यामुळे हिंदू समुहांना आता वस्तुस्थितीची जाणीव होऊ लागली आहे. मोदी सरकार आपल्याला सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याची त्यांची भावना होऊ लागली आहे. काश्मिरी पंडितांचे गेले दोनशे दिवस जम्मूमध्ये चालू असलेले आंदोलन हे त्याचेच उदाहरण आहे. काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात महसूल खात्यात कारकून असलेल्या राहुल भट याची गेल्या वर्षी बारा मे रोजी भर सरकारी कार्यालयात घुसून हत्या करण्यात आली. त्यानंतर याच रीतीने आणखीही काही कर्मचारी, शिक्षक तसेच स्थानिक कार्यकर्ते इत्यादींना मारण्यात आले. परिणामी सर्व काश्मिरी पंडित कर्मचार्‍यांनी संप पुकारला. जम्मूला बदली करण्यात यावी अशी मागणी घेऊन धरणे आंदोलन सुरू झाले. मोदी सरकारने त्यांना अधिक सुरक्षा पुरवण्याचे आश्‍वासन दिले. सर्व कर्मचार्‍यांची बदली जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात आली. त्यांच्यासाठी बाराशे घरे बांधण्याचा कार्यक्रम आखण्यात आला. तक्रारी ऐकण्यासाठी खास अधिकारी नियुक्त केले गेले. पण काश्मिरी पंडित कर्मचार्‍यांचे या कशानेही समाधान झालेले नाही. यामुळे राज्यपाल मनोज सिन्हा वैतागले आणि संपकरी कर्मचार्‍याचे पगार थांबवण्याची घोषणा त्यांनी केली. त्याचा उलटा परिणाम होऊन आंदोलकांनी भाजप कार्यालयावर धरणे दिले आणि नेत्यांना घेराव घातला. काश्मिरी पंडितांच्या नावाने भाजपवाले दिल्लीत गळा काढत असतात. काश्मिर फाईल्ससारखा खोटारडा व प्रचारकी चित्रपट बघा म्हणून खुद्द पंतप्रधान शिफारस करतात. आज तेच पंडित मोदी सरकारवरच सर्वाधिक नाराज आहेत हे काश्मीरचे वास्तव आहे. 370वे कलम रद्द केले असे सांगून भाजपला देशात इतरत्र मते मिळवायची आहेत. ती त्यांना मिळतीलही. पण मूळ प्रश्‍न सुटण्याऐवजी चिघळतच चालला आहे. आणि, ज्यांच्या नावाने हे केले तेच आज विरोधात आहेत हे लपवता येणारे नाही.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
संपादकीय

खलिस्तानचा वाद का चिघळतोय?

March 26, 2023
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

आता अति होतंय…

March 26, 2023
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
संपादकीय

उर्जास्त्रोतांवर भविष्याची भिस्त

March 25, 2023
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

मुठ्ठी में दुनिया

March 25, 2023
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

साखरेची गोड कहाणी 

March 25, 2023
पोफळीत वीजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यु
संपादकीय

कर्नाटकमध्ये राजकीय रस्सीखेच चर्चेत

March 22, 2023

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Archives

  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • November 2022
  • October 2022
  • September 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • January 1970
  • July 220

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?