• Login
Thursday, March 23, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

नाव ठेवायला जागा नाही

Varsha Mehata by Varsha Mehata
March 6, 2023
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भारतात सध्या दोन उद्योग जोरात आहेत. नावं ठेवणं आणि नावं बदलणं. नावं दोन प्रकारे ठेवली जातात. एक उदाहरण असं की पंडित नेहरुंचं नाव आता खलनायक आहे. त्यांचं खरं नाव खान आहे यावर व्हॉटसॅप विद्यापीठात बरीच पुस्तकं आहेत. विरोधी पक्षातल्या नेत्यांनी नावं बदलावीत असा खुद्द नरेंद्र मोदींचा आग्रह असतो हे आपल्याला ठाऊक आहेच. म्हणून तर राहुल हे गांधींऐवजी नेहरू हे आडनाव का लावत नाहीत अशी प्रेमळ विचारणा त्यांनी संसदेत केली होती. जुन्या गोष्टींची नुसती नावं बदलली तरीही जबरदस्त फरक पडतो यावर मोदींपासून सर्वांचा ठाम विश्‍वास आहे. उज्वला गॅस, जनधन योजना, प्रधानमंत्री आवास ही सगळी नवीन बारशानंतर टुणटुणीत झालेली बाळं आहेत. इतकी वर्षं ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी इत्यादींना आपण भरड धान्य म्हणत होतो. पण त्यांना आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन- यांचं नाव अजून तरी तेच आहे- यांनी श्रीअन्न अशी बढती दिली आहे. किंवा सध्याच्या काळाला अमृतकाळ म्हणायचं आहे. कारण, सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव चालू आहे. खरं तर सामान्य नागरिकांसाठी चालू काळ हा फारच चालू आहे. कारण, आलेला पैसा त्याच क्षणी त्यांच्या खिशातून बाहेर चालू पडत असतो. हा पैसा अदानीसारख्यांकडे जातो आणि ते जगातले कितव्या तरी क्रमांकाचे श्रीमंत होतात हेच त्यातल्या त्यात एक समाधान आहे. शहरं किंवा गावं यांच्यात जर सुधारणा व्हायला हवी असेल तर त्यांची नावं बदलायला हवीत हेही आपल्या नेत्यांना बरोबर कळले आहे. अलाहाबादचं प्रयागराज आणि मुघलसरायचं दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असं नाव बदललं आहे. लखनौचं लक्ष्मणपूर करण्याचं चाललं आहे. योग्य वेळ येताच तेही होईलच. निवडणुकांच्या काळात असा नामबदल केला तर त्या शहराचा विशेष वेगाने विकास होतो असं जुन्या पुराणांमध्ये म्हटलेलं असणारच. त्याखेरीज भाजपवाले हा विषय हाती घेणार नाहीत.
महाराष्ट्रही मागे नाही
महाराष्ट्र हा एक प्रगतीशील प्रदेश आहे. आजवर इथं बर्‍याच सुधारणा झाल्या. महात्मा फुले, आगरकर, शाहूमहाराज यांच्यापासून ते अगदी रं.धो. कर्वे किंवा नरेंद्र दाभोलकरांपर्यंत अनेक सुधारक इथं होऊन गेले. पण तरीही आपला म्हणावा तसा विकास होत नव्हता. याचं कारण आता सापडलं आहे. आपल्याकडे नावं बदलण्याची चळवळ पुरेशी जोरात झालेली नव्हती. सुदैवाने आता ती सुरू झाली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलल्यानंतर तिला वेग येत आहे. अहमदनगरचे नाव कसे बदलावे अशी गंभीर चर्चा सध्या सुरू आहे. ते अंबिकानगर करावे अशी जुन्या शिवसेनेची मागणी आहे. ही जुनी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. ठाकरे गटाकडच्या शिवसेनेचे नाव अजून ठरलेले नाही. बहुदा अहमदनगरच्या आधी याचाच फैसला करावा लागणार आहे. पण ते असो. दुसरीकडे नगर जिल्ह्यातील चोंडी इथं अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला असल्याने त्यांचेच नाव या शहराला द्यावे असा प्रस्ताव आहे. तसा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला पाठवला जाईल असे हिवाळी अधिवेशनात मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते.महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडला आहे अशी चर्चा मधूनमधून होत असते. अलिकडे बरेच खासगी प्रकल्प गुजरातेत गेले. पूर्वी असे होत होते ते समजण्यासारखे होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांचे सरकार होते. पण आता सरकारचे नाव बदलूनही फरक पडलेला नाही हे चिंताजनक आहे. शहरांची नावे बदलणे हा त्यावरचा जालीम इलाज आहे. तो खरं तर आधीच करायला हवा होता. त्यानुसार पुणे, कोल्हापूर यांची नावे फुलेनगर, शाहूनगर अशी करावी. सिंदखेडराजाच नव्हे तर पूर्ण बुलडाणा जिल्ह्याचंच नाव जिजाऊनगर करावं. अजून कोणी सुचवलेलं नाही. पण देहूचं तुकारामनगर आणि आळंदीचं ज्ञानेश्‍वरनगर केलं तर इंद्रायणी नदी आपोआप स्वच्छ होईल अशी एक शक्यता आहे.
रोग म्हणू नये आपला
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात एक याचिका निकाली काढली. देशातील मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिलेली नावे बदलून शहरे व स्थळे यांना त्यांची मूळ नावे द्यावी असे या याचिकेत म्हटले होते. यासाठी एक स्वतंत्र नामांतर आयोग स्थापन करावा अशी मागणीही करण्यात आली होती. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव अमृत् गार्डनर करण्यात आले मग औरंगजेब रोड वगैरे नावे का बाकी आहेत असे तिच्यात विचारले होते. न्यायमूर्तींनी याचिका फेटाळताना चार शब्द सुनावले. जुन्या काळात अडकून राहू नका. मुस्लिम राज्यकर्ते येथे राज्य करून गेले ही वस्तुस्थिती आहे. पण त्या धर्माचा द्वेष करू नका असा त्यांच्या म्हणण्याचा आशय होता. अर्थात याचिका नाकारली म्हणजे सर्व काही संपलेले नाही. मोदी सरकारला संसदेत कायदा करण्याची मुभा आहेच. नावे बदलण्याचा संबंधमुस्लिम राज्यकर्त्यांशी नसून विकासाशी आहे असे त्यात सरकार म्हणू शकेल. थोडक्यात धर्माचे नवे नाव विकास असे ठेवता येईल.खरे तर दिल्लीत मोदींनी आणि मुंबईत शिंदेंनी यासाठी एक स्वतंत्र मंत्रालयच निर्माण करायला हवे. कोणत्या ठिकाणांची नावे बदलावीत व नवी नावे काय असावीत याबाबत लोकांकडूनच सूचना मागवता येतील. नाहीतरी जगातला सर्वात स्वस्त मोबाईल डेटा आपल्याकडे मिळतो. लोकांनाही वेळ कसा घालवायचा असा प्रश्‍नच असतो. यातून नाव-बदलाला म्हणजेच विकासाला मोठी चालना मिळू शकेल. भविष्यात चुकून-माकून काँग्रेस किंवा विरोधकांचे सरकार आलेच तर त्यांना नावे ठेवायला एकही जागा शिल्लक राहणार नाही असा बंदोबस्त या सरकारांनी करायलाच हवा. सर्वोच्च न्यायालयाने नावे बदलणे हा काही तरी रोग असावा अशी त्याची संभावना केली. पण हा रोग नव्हे तर हजारो वर्षातून कधीतरी येणारा योग आहे, हे सर्वांना कळले पाहिजे.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

पोफळीत वीजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यु
संपादकीय

कर्नाटकमध्ये राजकीय रस्सीखेच चर्चेत

March 22, 2023
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

पुन्हा खलिस्तान  

March 22, 2023
पोफळीत वीजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यु
संपादकीय

हा तो नव्या-जुन्याचा संगम!

March 21, 2023
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

तोतयांचे सूत्रधार कोण?

March 21, 2023
पोफळीत वीजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यु
संपादकीय

कर्जांच्या अर्थकारणातली ‘ताईगिरी’

March 20, 2023
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

संपाचा धडा

March 20, 2023

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Archives

  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • November 2022
  • October 2022
  • September 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • January 1970
  • July 220

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?