महाड दुर्घटना:क्षणात होत्याचे नव्हते झाले; शेतकरी, मजूरांवर काळाचा घाला, 32 घरे ढिगाऱ्याखाली

महाड तालुक्यावर संकटामागुन संकट; प्रशासन झोपेतच, महाड तालुक्यात दरड कोसळली; ७२ लोक बेपत्ता
सायंकाळी दुर्घटना घडून देखील प्रशासन झोपेतच
I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I

महाड तालुक्यावर संकटामागुन संकट कोसळतच असतानाच सायंकाळी महाड तालुका बिरवाडी पासून 14 कीमीवर तलीये या गावी मुसळधार पावसामुळे दरड कोसळून सुमारे 32 घरे गाढली गेली असून 72 लोक बेपत्ता असल्याची माहिती तलीयेचे सरपंच यांनी दिली आहे. एनडीआरएफ च्या मदतीच्या प्रतिक्षेत ग्रामस्थ आहेत. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 4 NDRF तुकड्या गावात पोचण्याच्या प्रयत्नात आहेत; मात्र गावाकडे जाण्याचे बिरवाडी, खरवली मार्ग नदीला पाणी आल्याने बंद आहेत. त्यामुळे मदत कार्याला सकाळीच सुरूवात होईल अशी महिती आहे.

गाव उतारावर वसलेले असून टप्या टप्यावर घरे आहेत. एक दोन घरे सोडून बाकीचे घरे कच्ची आहेत. गावातील लोक मजुरी करणारे व शेतकरी आहेत. शिवसेना आमदारांच्या गावानजीक तलीये गाव आहे. जिल्हा प्रशासनाने या गावाला धोक्याचा इशारा दिला होता, मात्र कोणालाही सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले नसल्याचे समजते.

महाड, पोलादपूर परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली असून महाड शहर व सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. शहरातील दादली पुलावरून पाणी वाहत आहे, शहरातील व नदीकिनारी सखल भागांमध्ये पाणी पातळी वाढलेली आहे.

महाड तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या तलीये गावात संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे दरड कोसळून सुमारे ३० घरं गाडली गेली असून ७२ लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरड किती घरांवर कोसळली आणि त्यामुळे किती माणसं अडकली आहेत, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. पोलीस, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. मात्र रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे गावापर्यंत पोहोचणं शक्य नाही. तरीही प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

Exit mobile version