मुंबई । प्रतिनिधी ।
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यभरात 24 तासांच्या बंदची घोषणा केली आहे. त्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे. ठाणे शहरामध्ये शिवसेनेच्या कार्यकरत्यांकडून रिक्षावाल्यांना मारहाण करण्यात आली. तसेच विक्रोळी येथे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे टायर झाळून ब्लॉक केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईत राजभवनाबाहेर निदर्शने केली. महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले, लखीमपूर खेरी हिंसाचारात सहभागी केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलावर कोणतीही कारवाई झालेली नाही. भाजप शेतकरी विरोधी आहे आणि त्यांना चिरडायचे आहे.