आ.जितेंद्र आव्हाड यांचे आवाहन
| ठाणे | प्रतिनिधी |
शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बाळाराम पाटील यांनाच पुन्हा विधानपरिषदेत बहुमतानी विजयी करुन पाठविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आ.जितेंद्र आव्हाड यांनी केले. कोकण शिक्षक मतदार संघाची सार्वजनिक निवडणुकीच्या निमित्ताने ठाणे शहरात महाविकास आघाडी, टी. डी. एफ,महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अधिकृत उमेदवार बाळाराम द.पाटील यांच्या प्रचारार्थ ठाण्यात शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.
या सभेला उमेदवार बाळाराम पाटील यांच्यासह माजी खा.आनंद परांजपे, माजी नगरसेवक नजीब मुल्ला, पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भानुदास तुरुकमाने, बहुजन शिक्षक शिक्षक घर संघटना अध्यक्ष अशोक बहीरव यांची प्रमुख उपस्थिती होती. बाळाराम पाटील यांनी विस्तृत मार्गदर्शन करत उपस्थित शिक्षकांना पूर्ण विश्वास दिला की, येत्या काळात बीएलओच्या कामामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतोय त्यामुळे शिक्षकांना शिक्षकाचे काम करू द्या! बीएलओच्या कामाचा बोजा नको ही भूमिका घेऊन आवाज उठवणार असल्याचं सांगितलं तसेच आगामी काळात शिक्षकांच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर शिक्षकांचा गाडा मजबूत ठेवण्याचं काम करेल असा विश्वास यावेळी शिक्षकांना दिला.
आव्हाड यांनी आपल्या भाषणातून बाळाराम पाटील यांनी गेल्या सहा वर्षात शिक्षकांसाठी काम केले आहे. शिक्षकांचा हा आवाज विधानपरिषदेमध्ये पोहोचवण्याचं काम शिक्षकांनीच केले पाहिजे.त्यासाठी शिक्षकांनीची एकजूट महत्वाची असल्याचं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी ठाणे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी बाळाराम पाटील काम करणारा माणूस त्यामुळे शिक्षकांनी काम करणार्या माणसाला विधान परिषदेद पाठवले पाहिजे त्यांना पहिल्या पसंदिचे मत देऊन विजयी करावे असे आवाहन केले.
उमेदवार बाळाराम पाटील यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावले असल्याचा दावा केला. उपस्थित मान्यवरांनी दि. 30 जानेवारीला होणार्या निवडणुकीत बाळाराम पाटील यांना प्रथम पसंंतीचे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले. यावेळी ठाण्यातील शिक्षकवृंद,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.