डॉ. शरद माडीवाले यांचे प्रतिपादन
| मुरुड | जंजिरा |
सावकारी कर्जाच्या विळख्यातून मुक्तता करण्यासाठी सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सहकाराच्या माध्यमातून पोहचता येणे शक्य झाले आहे. पतसंस्थांमध्ये स्पर्धा असलीच पाहिजे, मात्र कारभार हा पारदर्शी असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. शरद माडीवाले यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोसवांतर्गत तालुक्यातील पतसंस्थांतर्फे आयोजित सहकार मेळाव्यात पतसंस्थांची आर्थिक सुरक्षितता या विषयावर सभासदांसह संचालक, कर्मचारी, पिग्मी, आर.डी. प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. मेळावा यशस्वीतेसाठी सर्व पतसंस्थांच्या कर्मचारीवृदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मेघराज जाधव यांनी, तर आभार प्रर्दशन अजित गुरव यांनी केले.