मणिपूर दुर्घटना 24 जवानांचा मृत्यू

| इंफाळ | वृत्तसंस्था |
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील भूस्खलन दुर्घटनेत आतपर्यंत चोवीस जणांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच 18 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यात 13 जवान आणि पाच नागरिकांचा समावेश आहे. अन्य मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. जिरीबाम येथे भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिस आणि एनडीआरएफचे पथक कालपासून घटनास्थळी वेगाने काम करत आहेत. पावसामुळे मदतकार्यात अडथळे आले. यावेळी हवाई दलाची देखील मदत घेण्यात आली. या भूस्खलनात किती जण बेपत्ता झाले आहेत, याचा नेमका आकडा सांगणे कठीण आहे. जिरीबामला इंफाळशी जोडणार्‍या एका रेल्वे मार्गाचे काम सुरू असून त्यासाठी तुपूल यार्ड येथे 107 जवानांची नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी रात्री तेथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आणि त्यात अनेक जण दबले गेले.

Exit mobile version