| महाड । प्रतिनिधी ।
c संमेलनाध्यक्ष सुरेश मेहता यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात इंग्रजी भाषा ही काळाची गरज असली तरी, इंग्रजी अनिवार्य असू नये असे सांगून मराठी भाषेजवळ असलेली आपली नाळ तोडू नये असे आवाहन केले. या संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी केले. यावेळी आ.भरत गोगावले, संमेलनाचे अध्यक्ष सुरेश मेहता, कोकण प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अलका नाईक, डॉ.अ.ना.रसनकुटे, फुलचंद नागटिळक, स्वागताध्यक्ष मंगल गांधी, सचिव रिचा गांधी, सुधीर शेठ, विशाल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरेश मेहता यांनी सद्या नवयुवक साहित्यापासून दूर जात असून त्याला पुन्हा यामध्ये ओढणे हा आपल्यासमोर प्रश्न असल्याचे सांगून इंग्रजी भाषेचा वापर काळाची गरज बनली असली तरी याकरिता मराठी भाषेचा बळी दिला जाऊ नये असे सांगून देशातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, गरीब, वंचित, शोषित, पिडीत यांसारख्या देशाचा कणा असलेल्या लोकांचा जीवनपट साहित्यातून उमटला गेला पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित कवींनी आपल्या कविता देखील सादर केल्या. राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न करण्यासाठी मंगल गांधी, नेत्रा मेहता, संगीता कांबळे, नेहा तलाठी, निलांबरी घोलप, त्रिवेणी मराठे, आदींनी मोलाचे सहकार्य केले.