अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सध्या रायगडात भातकापणीचा हंगाम सुरु असून,या काळात शेतात काम करताना सर्पंदंशासह अन्य जनावरांचा दंश शेतकरी,तसेच शेतात काम करणार्यांना होत असल्याच्या घटना घडत आहेत.यासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील उपचार उपलब्ध करुन द्यावेत,अशी मागणी शेकापतर्फे आरोग्य यंत्रणेला करण्यात आलेली आहे.
बदलत्या ऋतुमान,हवामानसोबत सर्पदंशाच्या घटना घडत असल्याने शेतकरी आणि शेतमजुरांनी देखील सावध रहायला हवे,असे आवाहनही शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.