। चिपळूण । प्रतिनिधी ।
पेढे कुंभारवाडी येथे अतिवृष्टीमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 6 घरे दरडीखाली गाडली गेली होती तसेच त्यात 3 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या दुर्घटनेला जबाबदार असणारे महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या वर गुन्हे दाखल न केल्याने तेथील ग्रामस्थ उपोषणाला बसेल आहेत त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेणेसाठी आमदार शेखर निकम यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली तसेच संबंधित अधिकारी वर्गाजवळ दूरध्वनिद्वारे संपर्क साधला व उपोषण लवकरात लवकर मागे घेण्यासाठी सूचना केल्या यावेळी जयंद्रथ खताते , मिलिंद कापडी, तुषार गमरे ,राजेश वाजे, खालिद पटाईत,भाऊ खताते,मुराद अडरेकर ,सरपंच प्रवीण पाकळे, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.