| मुरूड | वार्ताहर |
थंडीचे उबदार वातावरण आणि पर्यटनाचा मोसम असल्याने मुरूड तालुक्यातील काशीद, मुरूड, बारशिव, नांदगाव, सर्व्हे आदी पर्यटन स्थळांवर शनिवार पासून पर्यटकांचे मोठया संखेने राज्यातुन पर्यटक आले असून प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग आणि समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेलेले दिसून आले.
मुरूड, काशीद समुद्रकिनार्यावर तर पर्यटकांची मोठी पर्यटकांची मांदियाळी दिसून आली आहे. रविवारी मुरुडच्या जंजिरा जलदुर्गाकडे जाण्यासाठी मुरूड मासळी मार्केट मार्गावर सातत्याने कोंडी होताना दिसत होती. कोंडीची ही समस्या प्रदीर्घ काळापासून असून अजूनही कोणत्याही प्रशासनाने यावर उपाययोजना केलेली नाही. यामुळे येथे अपघाताची मोठी शक्यता आहे. मुरूड मार्केटमध्ये मासळी खरेदीसाठी रविवारी सकाळी मोठी गर्दी दिसत होती. सुरमई, पापलेट, रावस, बोंबील, कोळबी, मांदेली आदी मासळी मार्केट मध्ये दिसत होती. आलेल्या अनेक पर्यटक समुद्रात जलक्रीडा आणि पोहण्याचा आनंद लुटताना दिसत होते.
दिवाळी नंतर पर्यटक हाजारोंच्या संख्येने अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनारी पर्यटन स्थळांवर आले असून पर्यटनाचा मोसम पर्यटन व्यवसायिकासाठी सुगीचा ठरेल अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रविवारी जंजिरा जलदुर्ग पर्यटकांनी फुलून गेला होता. कोरोना मुक्त वातावरणातील यंदाचा पर्यटन मोसम असल्याने कंटाळलेले पर्यटक फॅमिली सहित पर्यटनाला निघाल्याचे दिसून आले. अनेक पर्यटकांनी तशा प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या. भविष्यात समुद्र किनार्यावरील पर्यटन मोठया प्रमाणात वाढण्याचे संकेत पर्यटकांनी रविवारी दुपारी बोलताना व्यक्त केले.