। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कड़ाव भागातील जमिनीची खरेदी करणार्या जमीन व्यावसायिक यांनी नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलला आणि त्यांचा परिणाम स्थानिकांच्या शेतात पाणी शिरले आहे.याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करून देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही.दरम्यान,नैसर्गिक नाल्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले असून शेतात उगवलेली भाताची रोपे कुजून जाण्याची शक्यता आहे.
कडाव परिसरातील सर्वे नंबर 83/2 च्या कब्जेदार श्रीमती सोनी ह्यांनी काही महिन्यांपुर्वी सदर सर्वे नंबरची जमीन विकत घेऊन जमिनीमध्ये मातीचा भरावा केला.परंतु,सदर भरावा करत असताना जागा मालक श्रीमती सोनी यांनी विकत घेतली आहे.शेतकर्यांच्या शेतातील पाणी जाणा-या नैसर्गिक मार्गावर खुप लहान आकाराचे पाईप टाकल्याचे आजुबाजुच्या शेतकर्यांना समजले असता सर्व शेतकर्यांनी जानेवारी 2022 मध्ये कडाव ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन पावसाळ्यात भात शेतीच्या होणा-या नुकसानीबाबत कळवले आहे. परंतु, शेतकर्यांच्या भातशेतीच्या होणा-या नुकसानीवर कडाव ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे सद्य परिस्थितीत कडाव परिसरातील अनेक शेतकर्यांना भातशेती करता येणार नसल्यामुळे येथील शेतकरी चिंतातुर झाला आहे. परिणामी त्या भागातील शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असल्यामुळे तसेच पाण्याचा नैसर्गिक वाहता प्रवाह बंद झाल्यामुळे शेतांमध्ये चिखल मातीसह वाहुन येणा-या दगडी मातीमुळे शेती कायमस्वरूपी नापीक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे येथील शेतकर्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकर्यांनी संभाव्य धोका ओळखुन जानेवारी 2022 मध्ये लेखी पत्र देऊनही कडाव ग्रामपंचायतीने काहीही कारवाई न केल्यामुळे कडाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उभे राहत आहे. तरी, कडाव ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्यांच्या भातशेतीच्या होणा-या नुकसानी बाबत वरिष्ठ अधिकार्यांनी तसेच कर्जत तहसिलदार ह्यांनी जातीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे अशी चर्चा परिसरातील शेतकरी करत आहेत.त्यात अगोदरच कर्जत तालुक्यातील शेतकरी नामशेष होत चालला आहे. तरीही, अनेक शेतकरी काबाडकष्ट करून आपली शेती करत आहेत. म्हणुन प्रशासनाने देखील शेतकर्यांना सहाय्य करुन सर्वोतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे.