सामाजिक विचार मंचातर्फे व्याख्यानमालेचे आयोजन

| मुंबई | वार्ताहर |

कांजुरमार्ग -मुंबई येथील सामाजिक विचार मंचाकडून सालाबादप्रमाणे यावर्षी देखील तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दि 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान रात्रौ 7. 00 वाजता भांडुप (पूर्व) पुर्व येथील कांजूर सोसायटीचे मैदान (क्रॉम्प्टन मैदान), गणेश मंदिरासमोर, दातार कॉलनी या ठिकाणी हि व्याख्याने होणार आहेत.

पहिल्या दिवशी श्री अभय जगताप यांचे “रामराज्य ते स्वराज्य ”या विषयावर, दुस-या दिवशी सौ. मेधा जेरे यांचे “कौटुंबिक व्यवस्थापन आणि स्वास्थ्य ” “या विषयावर व्याख्यान होईल तर तिसऱ्या दिवशी श्री रविकिरण पराडकर ( ) पोलिस दलातील कडू – गोड आठवणी “ हा विषय घेऊन आपले विचार व्याख्यानातून मांडणार आहेत.

कांजुर-भाडुप (पुर्व) विभागात स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने 2013 पासून सामाजिक विचार मंचाने या व्याख्यानमालेची सुरूवात केलेली आहे.. विशेषतः गतवर्षी पासून मंचाकडून कांजूर – भांडूप परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे देखील आयोजन केले जात आहे.

तेव्हा व्याख्यानमालेच्या माध्यमातून समोर आलेल्या वैचारिक सुवर्णसंधीचा विभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंचाकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीकरता अध्यक्ष- श्री.बाळशीराम गाडगे- 9987302572, सचिव श्री.संतोष पासलकर सर- 9821761496, उपाध्यक्ष विष्णू भगत - 9870552500, कोषाध्यक्ष भगवान पोखरकर - 8850453436 यांच्याशी संपर्क करावा
Exit mobile version