मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांचे आवाहन
मुंबई | प्रतिनिधी |
दीपावली हा प्रकाशाचा सण आहे. दिपावली म्हणजे रोषणाई, उल्हासाने भरलेला उत्सव आहे. याकाळात विजेचा वापरही वाढतो. म्हणून दीपावली साजरी करताना सुरक्षा बाळगावी व विजेचा काटकसरीने वापर करून या सणाचा भरपूर आनंद घ्यावा असे आवाहन महावितरणच्या भांडूप परिमंडळतर्फे सर्व वीज ग्राहकांना करण्यात आला आहे.
दिवाळीनिमित्त होणारी सजावट, रोषणाई, आतीषबाजी यामुळे अपघात होऊन दुर्दैवी घटना घडू शकतात. सुरक्षेची खबरदारी घेतली तर अपघात टाळता येतो. रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे, त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्याव्यात. फटाके उडवतानाही काळजी न घेतल्याने दुर्घटना घडतात. घर उजळवण्यासाठी मोकळ्या जागेतच दिवे लावावेत. मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दूर तसेच पंखे, वीज तारांपासून दूर ठेवावेत. तुटलेल्या वीज तारा वापरू नयेत, जोड देताना योग्य दर्जाच्या इन्सुलेशनची टेप वापरावी, तुटलेले सॉकेट्स वापरू नयेत, घरात कुणीही नसताना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत, असे आवाहन भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी वीज ग्राहकांशी केले आहे.
आता सर्व पूर्वपदावर आल्यानंतरही त्यांना वीजबिल वसुली करण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. म्हणून, दिवाळीच्या निमित्ताने ज्या ग्राहकांची वीज जोडणी तात्पुरती खंडित केली आहे तसेच इतर सर्व ग्राहकांनी आपले थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे. 1 नोव्हेंबर 2021 पासून वीजबिल रोखीने भरण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, विनामर्यादा रकमेचे वीजबिल भरणा करण्यासाठी ग्राहक ऑनलाईन पद्धतीचा वापर करू शकतात. ऑनलाईन पध्दतीने भरणा करण्यासाठी महावितरणच्या संकेत स्थळावर ुुु.ारहरवळीलेा.ळप किंवा महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे करू शकतात. वीज बिलाचा ऑनलाईन पध्दतीने भरणा केल्यास ग्राहकास त्वरीत त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे पोच मिळते. ऑनलाईन वीज बिल भरणा पध्दत अत्यंत सुरक्षित असुन सर्व ग्राहकांनी याचा जास्तीत जास्त वापर करावा.