नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील जनतेला शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालय अडीअडचणी आणि गरजेच्या वेळी आपले वाटले पाहिजे असे काम या संपर्क कार्यालयातून व्हायला हवे अशा शुभेच्छा माजी आमदार आणि शेकापचे जेष्ठ नेते पंडित पाटील यांनी दिल्या.कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संपर्क कार्यालयाचे उदघाटन पंडित पाटील यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाचे जनसंपर्क कार्यालय डिकसळ येथे उघडण्यात आले आहे.या कार्यालयाचे उद्घाटन शेकापचे नेते आणि माजी आमदार पंडित पाटील यांचे हस्ते झाले.
त्यावेळी शेकापचे पुणे विभाग चिटणीस श्रीमंत कोकाटे,शेकापचे प्रदेश खजिनदार राहुल पोकळे यांच्यासह शेकापचे नेते विलास थोरवे,ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवे,पुरोगामी युवक संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील,जिल्हा परिषद सदस्या सीमा सुदाम पेमारे,पुरोगामी युवक संघटना कर्जत तालुका अध्यक्ष वैभव भगत, शेकापचे कर्जत तालुका उपाध्यक्ष राजेंद्र विरले,उमरोली जिल्हा परिषद गटाचे चिटणीस रामदास शेलार,विष्णू कालेकर,आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी बोलताना शेकापचे नेते पंडित पाटील यांनी कर्जत तालुका हा शेकापचा बालेकिल्ला होता,तो सुवर्णकाळ बनविण्याचे आव्हान आपल्या पिढीतील कार्यकर्त्यांपुढे आहे.आता आपल्या पक्षात मोठ्या प्रमाणावर तरुण कार्यकर्त्यांचा भरणा आहे आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने शेकपकडे आकृष्ट होत आहे.हे लक्षात घेता शेकपला पुन्हा चांगले दिवस कर्जत तालुक्यात येण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे या कार्यकायातून शेकाप वाढविण्याचे काम झाले पाहिजे त्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी आम्हाला कितीही वेळा पक्षाच्या कार्यक्रमांना बोलावले तरी आम्ही उपस्थित राहू असा शब्द पंडित पाटील यांनी दिला.