नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याला एनआयए या तपास यंत्रणेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण, सर्वोच्च न्यायालयाने एनआयएची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती यू. यू. ललित, न्यायमूर्ती रविंद्र भट आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यास कुठलंही कारण दिसत नाही, असं निरीक्षक सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.