। उरण । वार्ताहर ।
जेएनपीटी मार्गावरील खचलेल्या रस्त्याच्या जागी कोस्टल रोडच्या सुरुवातीलाच मोठा खड्डा पडला असून मृत्यूचा सापळा निर्माण झाला आहे. याकडे मात्र नॅशनल हायवे अथोरिटीचे दूर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवाल प्रवाशी नागरीकांमधून विचारला जात आहे.
जेएनपीटी महामार्ग हा कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्ध आहे. मागील काही महिन्यांपूर्वी जेएनपीटी महामार्गाचा रस्ता द्रोणागिरी जवळच्या इथे खचून भगदाड पडले होते. आता मात्र तो रस्ता तयार होऊन वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. मात्र उड्डाण पुलाच्या खालून कोस्टल रोडकडे आणि कोस्टल रोडकडून जेएनपीटी हायवेकडे जाणार्या सर्व्हिस रोडच्या रस्त्यावरील काँक्रीट रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा निर्माण झाला आहे. सदर खड्ड्याकडे दुर्लक्ष केले तर पावसाळ्यात मोठा खड्डा पडून रात्री अपरात्री अपघात होण्याची संभवना नाकारता येत नाही. तरी नॅशनल अथोरीटीने सदर रस्त्याच्या खड्ड्याकडे, रस्त्याच्या साईट पट्ट्यांकडे लक्ष केंद्रित करून पूर्ववत करावा अशी मागणी मनसेचे उरण तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे.