कुंभारआळी भागातील गटारांची दुरावस्था

 । नेरळ । वार्ताहर ।
 नेरळ ग्रामपंचायत मधील कुंभारआळी भागातील गटारे अल्पावधीत नादुरुस्त झाली आहेत.2016-17 मध्ये बांढलली गटारे कोसळून गेली असून त्या गटारांमधून वाहणारे सांडपाणी तेथेच थांबून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याबाबत ग्रामपंचायत कडे तक्रारी करून देखील कोणीही लक्ष देत नाही,त्यामुले दुर्गंधी अधिक वाढत आहे. सांडपाण्यावर तरंगणारे जीवजंतू ,तुंबलेले व अस्वच्छ गटारे याबाबत ग्रामपंचायतीला अनेकवेळा स्थानिकांनी  तक्रारी आणि पत्रव्यवहार केला आहे.मात्र नेरळ ग्रामपंचायतीचे स्वच्छतेबाबत उदासीन धोरण या गटारांबाबत दिसून येत आहे.अर्धवट बांधलेल्या गटाराचे बांधकाम पुर्ण करण्याकडे देखीलअक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.अशा अर्धवट अवस्थेत बांधलेल्या गटारातून वाहणारे सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत जाणुनबुजून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे का?असे एकंदरीत परिस्थिती पाहता दिसून येते.

Exit mobile version