जेएनपीटी | वार्ताहर |
देशातील मोठा आणि महत्वाचा ओएनजीसीचा प्रकल्प उरण तालुक्यात असून या प्रकल्पामध्ये नागाव आणि म्हातवली या दोन गावांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र मागील 40 वर्षात येथिल प्रकल्पग्रस्तांचे व स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन केले नाही त्यामुळे नागाव, म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेतर्फे सोमवारी ( 28 जून) आंदोलन करण्यात येणार आहे. ओएनजीसी प्रकल्पात मागील पाच वर्षात 350 कामगारांची नोकर भरती केली असून या भरतीमध्ये स्थानिकांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले.कंत्राटी कामगार नोकरभरती मध्ये देखिल स्थानिकांना डावलण्यात आले. कंपनीचा सीएसआर फंड स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये न वापरता इतरत्र वापरला जातो आणि 3 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या तेल गळती नंतर कंपनीने येथे काय खबरदारी घेतली आहे या बाबतचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.