अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पुप्ष नक्षत्राच्या पहिल्याच चरणात रायगडसह संपूर्ण मुंबईला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे.रायगडातील अलिबाग,रोहा,मुरुड,पेण,पनवेल,खालापूर या तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे.नद्यांच्या पाण्याची पातळीही वाढली आहे.
दिवसभरात सरासरी 118 मि.मी. नोंद रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 118.29 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून रविवार अखेर एकूण सरासरी 1683.79 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
अलिबाग- 147
पेण- 168
मुरुड- 136
पनवेल- 182
उरण-155
कर्जत- 74.40
खालापूर- 113.00
माणगाव- 51
रोहा- 184
सुधागड
तळा- 85
महाड- 68
पोलादपूर- 69.00
म्हसळा- 113
श्रीवर्धन- 89
माथेरान- 138
नद्यांची पातळी
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.75 मी., अंबा नदी (नागोठणे बंधारा)-5.90 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-4.05 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18. 50 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44. 50 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-3.50 मी. इतकी आहे.