सायबर गुन्हे रोखण्यासाठी रॅली

| दांडगुरी । वार्ताहर ।

बोर्ली पंचतन गावामध्ये पोलीस ठाण्याच्यावतीने सायबर साक्षर गाव अभियानांतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाईल तसेच सोशल मिडीयाचा वापर करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. किंबहुना प्रत्येक जण याचा वापर करीत आहे, विशेषतः फेसबुक, इंस्टाग्राम वापरत असताना अनेकांची फसवणूक होत आहे. याबाबत सायबर गुन्हे घडू नयेत यासाठी सायबर साक्षर गाव अभियान दिघी सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने घेण्यात आले होते. या रॅलीमध्ये महिला पोलीस नाईक संजना चव्हाण, पोलीस नाईक सातपुते, प्रसाद पिसाट, विश्‍वास रसाळ, ए आर उंद्रे, प्रा. आरिफ अन्सारी, शिक्षक अब्दुल वाहिद खान, मनोज कातकर कर्मचारी सिद्धार्थ कवाडे, निलेश मोरे आदी सहभागी होते.

Exit mobile version