2700 एकर भातशेतीचे होणार सरक्षंण
। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील गडब-माचेला येथील नादुरुस्त झालेला नाला तातडीने बांधून देण्याचे आदेश जेएसडब्ल्यू कंपनीला खारलॅन्ड विभागाने दिले आहेत.
नादुरुस्त बंधार्यामुळे पेण तालुक्यातील खारमाचेला, खारचिर्बी, खारघाट, खारजांभेळा व जुईअब्बास विभागातील साधारणता 2700 एकर शेतीत खारे पाणी शिरून सुपीक शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. त्या मुळे या विभागातील शेकडो शेतकरी धास्तावले आहेत. खारलँड विभागाने शेतीचा बचाव करणारी खारबंदिस्ती तोडल्याने वेगवान प्रवाहाने खारे पाणी शेतात शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील शेतीला फटका बसणार आहे. शेतीवर अवलंबून शेकडो शेतकरी उध्वस्त होणार आहेत. त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने येथील शेतक-यांनी बुधवारी खारलॅण्ड विभागाने तोडलेला बंधारा बांधण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा व सामुहीक आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने खारभुमी विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास सांवत व येथील शेतक-यां सोबत बैठक होऊन येथील बंधारा जेएसडब्लु कंपनीने बांधावा असे लेखी पत्र देत आदेशच खारभुमी विभागाने जेएसडब्लु कंपनीला दिले आहेत.
यावेळी तुळशीदास कोठेकर, अंकुश म्हात्रे, निलेश कोठेकर, विजय पाटील, चद्रकांत पाटील, सिताराम चवरकर, दीपक कोठेकर, समीर म्हात्रे, प्रभाकर कोठेकर, प्रशांत म्हात्रे, अभिमन्यू कोठेकर, परशुराम मोकल, अनिल कोठेकर, अमोल म्हात्रे, विजय मढवी, कृष्णा म्हात्रे, हरेष कोठेकर, स्वप्नील सीताराम कोठेकर, अमित पाटील, हेमंत कोठेकर, किशोर मोकल, प्रभाकर कोठेकर, जगदीश कोठेकर, सुनील मोकल आदांसह असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या परिसरातील बांधाना तडे (खांडी ) जावुन शेतक-यांच्या शेतात खारे पाणी जात असल्यामुळे खारभुमी विभागाने जेएसडब्लु कंपनीकडे बांधबदिस्तीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला होता, त्यानुसार धरमतर खाडी किनारी सीएसआर फंडातुन खारभुमी विभागाचे सहकार्याने बांध बांधले आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक शेतक-याच्या शेकडो एकर जमिनी वाचल्या आहेत.
नारायण बोलबंडा
जे.एस.डब्ल्यू कंपनी अधिकारी कोट
जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून खारमाचेला येथील बंदिस्ती काही शेतकर्यांच्या तक्रारी नुसार काढण्यात आली होती. या बाबत गडब, जुई अब्बास, खारमाचेला, खारचिरबी, जांभेळा या विभागातील शेतकर्यांनी खारभूमी कार्यालयात येऊन आपली बाजू मांडली आहे. त्या अनुषंगाने येथील जे.एस.डब्ल्यू कंपनीला पुन्हा एकदा ही बंदिस्ती करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सुहास सावंत
कार्यकारी अभियंता, खारभूमी विभाग पेण