‘सूर्यामुळे आत्मविश्‍वास वाढला’

| मुंबई | वार्ताहार |

सूर्यकुमारच्या अफलातून फलंदाजीमुळे आमच्या संघातील इतर फलंदाजांचा आत्मविश्‍वास वाढला आहे, असे मत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे. ‘360 डिग्री’ फलंदाज असा लौकिक असणार्‍या सूर्यकुमारने गुजरातविरुद्ध अद्भुत अशी शतकी खेळी साकार केली. सूर्यकुमार कमालीची फलंदाजी करत आहे. डावखुरा आणि उजवा फलंदाज अशी विविधता ठेवण्यासाठी आम्ही फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करत आहोत; परंतु या सामन्यात मला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे, असे सूर्यकुमारने सांगितले आणि आम्ही त्याचा आग्रह मान्य केला. पुढे जाऊन सूर्यकुमारने संपूर्ण मैदान दणकावून सोडले, असे रोहितने सांगितले.

Exit mobile version