समुद्रातील कचर्‍यामुळे जलप्रदूषणची गंभीर समस्या

| उरण । वार्ताहर ।

समुद्रात टाकण्यात येणार्‍या विविध प्रकारच्या लाखो टन कचर्‍यामुळे सागरी उदर सध्या कचराभूमीचे आगर बनू लागले आहे. त्यामुळे समुद्रात जल प्रदूषण निर्माण होऊ लागले आहे. या कचर्‍या बरोबरच समुद्रातून चालणार्‍या महाकाय जहाजांतून गळती होणार्‍या तेलामुळे ही जलप्रदूषण वाढू लागले आहे. बंदरात येणार्‍या अनेक जहाजातून जहाजावरील कचराही समुद्रात टाकला जात आहे. त्यामुळे जलप्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होऊ लागली आहे.

कचरा समस्या सर्वत्र आहे. मात्र ही समस्या आता समुद्रात व किनार्‍यावर वाढू लागली आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या किनार्‍याची स्वच्छता व निगा राखण्याची आवश्यकता आहे. त्याकरीता अनेक समाजसेवी संस्था कडून किनारा स्वच्छता मोहिमा राबविल्या जातात. या मोहिमांमुळे किनार्‍यावरील स्वच्छता होत असली तरी समुद्रात टाकण्यात येत असलेल्या कचर्‍यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायोजना आवश्यक आहे. त्याशिवाय समुद्रातील प्रदूषणाला आळा बसणार नाही. समुद्रात टाकण्यात येणारा कचरा हा निसर्ग नियमानुसार समुद्र किनार्‍यावरच येत असल्याने प्रदूषणा बरोबरच किनार्‍यावरील प्रदूषणात वाढ झाली आहे.

मच्छिमारांना फटका
समुद्रातील वाढता कचरा व त्यामुळे होणारे प्रदूषण याचा फटका मच्छिमारांना बसू लागला आहे. अनेकदा मच्छिमारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात कचरा येत आहे. त्यामुळे भर समुद्रात मासळीची जाळी ओढतांना मच्छिमारांची दमछाक होत आहे.

Exit mobile version