। गोवे- कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्ग हा वाहतुकीच्या व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महामार्ग असून या महामार्गाच्या दुतर्फे लहान मोठी वृक्ष मोठया प्रमाणात होती. ती या महामार्गाच्या चौपदरी करणात पूर्णपणे तोडण्यात आली. यामुळे प्रवाश्यांसह, शेतकरी, वाटसरू यांना सावलीचा मोठा आधार होता. कोकणात येणार्या वाहणांना ही देखील क्षणभर विक्षांती उपयुक्तठरत होती. परंतु सद्यास्थितीत तापमानाचा पारा ही 42 अंशाच्यावर चढला असून सावलीचा आधार असणारी झाडे पूर्णपणे चौपादरीकरणात नष्ट झाली असल्यामुळे या महामार्गावरील सावली हरपल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस तापमानात मोठया प्रमाणात वाढ होत असून सर्वत्र उष्म्याने कहर केला असून सकाळी दहा नंतर कोणीही बाहेर पडत नसल्याने रस्ते ही ओस पडले ब आहेत. एके काळी कोकणात सुट्टीसाठी येणार्या लहान मुलांच्या वठावर झुक-झुक अगीनगाडी गाडी, पळती झाडे पाहू या मामाच्या गावाला जाऊ या वृक्ष तोडीमुळे या गाण्याचा विसर पडला आहे. महामार्गावरील चौपदरीकरणात बारा वर्षापूर्वी लाखो वृक्षाची कत्तल करण्यात आली परंतु त्यांच्या जागी नवीन झाडे ही लावली गेली नाही. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांची लागवड करावी. यामुळे या महामार्गावरील वृक्षवल्ली पुन्हा बहरेल व वातावरणात होणारा बद्दल ही थांबेल असे निसर्गप्रेमी व प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.