शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन
। अलिबाग विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष हा एक विचार आहे. शेकापक्षाचा कार्यकर्ता संस्कारी आहे. निवडणूक काळातच राजकारण करणारा शेकापक्षच समाजकारण करुन जनतेच्या प्रत्येक संकटात मागे नव्हे तर मदतीचा हात करण्यासाठी पुढे असतो. त्यामुळे कामगार, कष्टकरी, शेतकरी यांच्यासोबत असणारी बांधीलकी जपणार्या आपल्या पक्षाला जनता कधीच विसरणार नाही असा विश्वास शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.
शेतकरी कामगार पक्षाच्या रामराज विभागातील कार्यकर्त्यांची बेलोशी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेकापक्षाने गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे आदी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीत शेकापक्षाने कोरोना काळात,चक्रीवादळ, लोकडाऊन या काळात केलेल्या कामाचं कौतुक करण्यात आलं. ज्या हिरीरीने कार्यकर्त्यांनी या काळात जनतेला सेवा दिली त्याबद्दल कार्यकर्त्यांचही कौतुक करण्यात आले. चित्रलेखा पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी मागील आढावा घेत सर्व कार्यकर्ते एकत्र आल्याचा आनंद व्यक्त केला. शेकापक्षाचे कार्यकर्ते महेंद्र विद्रे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जनतेसाठी केलेल्या सामाजिक वैयक्तिक कामांबद्दल त्यांचा पुरोगामी युवक संघटनेतर्फे गौरव करण्यात आला. तसेच, त्यांच्या मार्फत ज्यांना अनुदान मिळाले आहे अशा मुलींना अनुदान व शुभेच्छा पत्र देण्यात आले. यावेळी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्यासह पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, बेलोशी ग्रामपंचायत सदस्य गणिता कारभारी, सदानंद थळे, जयंत थळे, संदीप वारगे, निलेश वारगे, प्रशांत पाटील, भोपी सर, वैभव मुकादम, निनाद वारगे, अनुज पाटील, वेदांत कंटक, अक्षय डिकले, रोहित पाटील, साई पाटील, अनिश मिठागरी तसेच बेलोशी येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.