| उरण | वृत्तसंस्था |
मावळ लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे-पाटील यांना उरण तालुक्यातून भरघोस मताधिक्य मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस विकास नाईक यांनी आपल्या वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे निश्चितच महायुतीच्या उमेदवारांना तालुक्यातून पराभवाची धूळ चारण्यात येईल असा विश्वास जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी व्यक्त केला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी नियोजन आखणी करण्यासाठी उरण/ पनवेल मधील प्रमुख कार्यकर्त्यांची जासईचे सरपंच संतोष घरत यांच्या पेट्रोल पंपावर इंडीया आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन शुक्रवारी (दि.26)करण्यात आले होते. यावेळी शेकापक्षांनी आपल्या गनिमी काव्यातून विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी राजकीय रणनीती मांडण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. यावेळी बैठकीसाठी मा. आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटील, मा. आमदार मनोहर शेट भोईर, रायगड जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष महेंद्र घरत, शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रितमशेट म्हात्रे, भावना घाणेकर, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस विकास नाईक, नरेश रहाळकर, रमाकांत पाटील, रमाकांत म्हात्रे, काका पाटील, सरपंच संतोष घरत तसेच इंडिया आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.