शोएब अख्तरचे मोठं वक्तव्य

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

टी-20 विश्वचषकातील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्या अगोदर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरले मोठे वक्तव्य केले आहे. शोएब अख्तर त्याच्या अधिकृत यूट्युब चॅनेलवर म्हणाला, मी नेहमीच भारताने स्पर्धा जिंकण्याच्या बाजूने होतो. गेल्या वर्षी जेव्हा भारत विश्वचषक जिंकू शकला नाही तेव्हा मला वाईट वाटले कारण ते हारण्यासाठी नाही जिंकण्यासाठी पात्र होते. रोहित शर्माने वारंवार सांगितले आहे की, त्याला ट्रॉफी जिंकायची आहे आणि म्हणूनच तो विश्चचषक जिंकण्यास पात्र आहे. तो एक मोठा खेळाडू आहे आणि त्याचा शेवट मोठ्या स्तरावर व्हायला हवा. तो निस्वार्थी कर्णधार आहे, संघासाठी खेळतो.

Exit mobile version