व्यवसायिकांसह ग्राहकांची होतेय गैरसोय
। कोलाड । वार्ताहर ।
डिजिटल करन्सीच्या युगात आता सुट्टे पैसे मिळणे कठीण झाले आहे. यामुळे बाजापेठेतील छोटे मोठे व्यावसायिकांना सुट्टे पैसे मिळत नसल्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे.
बाजारात वस्तु खरेदी करण्यासाठी जातो. यावेळी आपण दुकानदाराला 500 रुपयाची नोट देतो. तो देखील सुट्ट्या पैशांची मागणी करतो. एसटी बस, रिक्षा, मिनिडोअर व इतर प्रवाशी वाहने सुट्ट्या पैशाची मागणी करीत असतात. परंतु, आधुनिक काळातील डिजीटल युगात आपण जिपे, कार्डमनी आपण सहजपणे वापरत असतो. पण यामुळे सुट्ट्या पैशांची कमतरता निर्माण होताना दिसत आहे. अनेकदा दुकानदारांना देण्यासाठी आपल्याकडे सुट्टे पैसे नसतात. काही वेळा तर सुट्टे पैसे नसल्याने घेतलेली एखादी वस्तू परत द्यावी लागते.
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता 500 रुपयांच्या शिवाय नोटा निघत नाही. ही नोट वस्तू खरेदीसाठी बाजारात घेऊन गेले असता बाजारात सुट्टे पैसे उपलब्ध नसल्याने काही वेळा वस्तु खरेदी करू शकत नाही. स्पर्धेच्या युगात छोटे दुकानदार, पानपट्टीधारक तसेच वडापाव व्यावसायिक यांना दोन तीन रुपयांवर व्यवसाय करावा लागत आहे. यामुळे सुट्ट्या पैशांच्या कमतरतेमुळे या व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होताना दिसत आहे. यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन रिझर्व बँकेकडे सुट्टे पैसे बाजारात उपलब्ध करण्यासाठी मागणी करणे गरजेचे झाले आहे. बाजारात सुट्टे पैसे उपलब्ध व्हावे अशी मागणी व्यावसायिकांसह ग्राहक वर्गातून केली जात आहे.