श्रीधर पाटील यांचे निधन

। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील पेंढाबे गावचे श्रीधर बाळाराम पाटील उर्फ (केसरीनाथ बागवाले) यांचे रविवार दि 13 फेब्रुवारी रोजी वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले. यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण परिसरावर शोकांतिका पसरली अत्यंत शांत मनमिळाऊ, सदा स्मित हास्य आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभाग असा त्यांचा स्वभाव होता.
पाटील माझगाव डॉक् येथे नोकरीत होते. ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, भुवनेश्‍वर मंदिर ट्रस्ट व 14 गाव संघटनेचे अध्यक्ष, पेंढाबे जमीन एकत्रितकरण समितीचे अध्यक्ष अशी अनेक पदे आपल्या कारकिर्दीत भूषविली. नाटय कला, कुस्तीपट्टू अशी त्यांची ओळख होती. त्यावर पेंढाबे गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी विविध सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक आणि पत्रकार मान्यवर उपस्थित होते. दीपक पाटील बावीस गाव समितीचे अध्यक्ष अर्जुन गावंड, पद्माकर पाटील, कलाकार सतेज अपणकर नरेंद्र पाटील गुरुजी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि 24 फेब्रुवारी रोजी भुवनेश्‍वर येथे होणार आहे.

Exit mobile version