विधेयक रद्द करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
राज्य सरकारने विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत ठेवले आहे. हे विधेयक अन्यायकारक असल्याचा आरोप समाजक्रांती आघाडीने केला आहे. त्यामुळे त्या विधेयकाविरोधात संघटनेने पावले उचलली आहेत. विधेयक रद्द करण्यात यावे, अशी मागमी समाज क्रांती आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना मंगळवारी (दि.6) निवेदन देण्यात आले आहे.
राज्यात नक्षलवादाच्या नावाखाली वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटनांची गळचेपी करण्याचा डाव आहे. संविधानिक कक्षेत काम करणार्या, संविधान मानणार्या संघटना व कार्यकर्त्यांची मुस्कुटदाबी, सरकार आणि सरकारी यंत्रणेवर टीका करणार्यांना दाबण्याचा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून केले जाणार आहे, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे समाजक्रांती आघाडीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. जन सुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे.