। पाली/बेणसे । वार्ताहर ।
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कोकणात निसर्गाच्या लहरीपणामुळे भातशेती धोक्यात आली आहे. अशातच शेतकर्यांच्या हमी भावाने भात खरेदी व्यवहारात होत असलेल्या त्रुटी तात्काळ दूर कराव्यात अशी महत्वपूर्ण मागणीचे निवेदन रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरीचंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. सदर मागण्यांमध्ये शेतकर्यांचे भात शासन नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून शासन हमीभावाने भात खरेदी करीत असते परंतु शेतकर्यांना हमीभाव केंद्रावर त्याच्या भाताची पूर्ण रक्कम 15 दिवसांत मिळावी, शेतकर्यांच्या बोनसची रक्कम हमीभावासहीत 15 दिवसात मिळावी म्हणजे नवीन पिक साठीचा शेती सर्व करण्यास शेतकयास कोणाकडे हात पसरावे लागणार नाही, हमीभावात स्वामीनाथन आयोगाची शिफारस विचारात घेऊन त्यात दुपटीने वाढ व्हावी अशी शासनास शिफारस करण्यात यावी नापिक झालेल्या शेतीची पाहणी करुन ज्या केमिकलच्या पाण्याने शेती ओसाड झालेली आहे अशा शेतकर्यांना दरवर्षी नुकसान भरपाई देण्याबाबत चखऊउ मंडळास आदेश द्यावेत अशा विविध मागण्या केल्या आहेत. दरम्यान, रायगडच्या भात पिक घेणार्या शेतकर्यांनी शेती व्यवसाय सोडु नये यासाठी वरील सर्व मागण्यांची पुर्तता व्हावी यासाठीचे सर्व प्रयत्न व सहकार्य शासनाने करावे अशी विनंती वजा मागणी निवेदनाद्वारे केली आहे.