एसटीच्या बडतर्फ कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही

। मुंबई । वृत्तसंस्था ।
एसटीच्या बडतर्फ कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही ईं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. सरकार म्हणून हातावर हात ठेवून आम्ही बसू शकत नाही. ज्याप्रमाणे कामगारांप्रती आमचं दायित्व आहे तसंच जनतेप्रतीही आहे, त्यामुळे ही कारवाई ताबडतोब मागे घेणार नाही असं अनिल परब यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं आहे.
बडतर्फची कारवाई झाली की त्याला पुन्हा एक प्रक्रिया आहे. आम्ही लगेच बडतर्फीची कारवाई मागे घेऊ शकणार नाही. कारण आम्ही कारवाया मागे घेत असताना कामगार कामावर येत नाही आहेत. आमच्यावर कोणताही कारवाई होणार नाही असा कामगारांचा समज झाला आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
सरकार म्हणून हातावर हात ठेवून आम्ही बसू शकत नाही. ज्याप्रमाणे कामगारांप्रती आमचं दायित्व आहे तसंच जनतेप्रतीही आहे. त्यामुळे ही कारवाई ताबडतोब मागे घेणार नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. एसटी पूर्ण क्षमतेने सुरु होईल तेव्हा पुढच्या कारवायांसंबंधी निर्णय घेतला जाईल. पण आत्ता मी बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही, असं अनिल परब यावेळी म्हणाले.सरकारी सेवेत विलीनीकरणाचा प्रत्येकाचा हट्ट पूर्ण करता येणार नाही, असे स्पष्ट करीत विलीनीकरणाचा विषय एसटी कर्मचार्‍यांनी डोक्यातून काढून टाकावा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या संपावर असलेल्या कर्मचार्‍यांना शुक्रवारी दिला.विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालय अंतिम निकाल देईलच, पण सरकारने बहुतांशी मागण्या पूर्ण केल्याने कर्मचार्‍यांनी कामावर हजर व्हावे. अन्यथा गिरणी कामगार जसे देशोधडीला लागले तशी वेळ एसटी कर्मचार्‍यांवर येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. एसटी मंडळाने कारभार सुधारावा आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे सुचविताना भाडेवाढीच्या पर्यायांचा विचार करण्याची सूचना पवार यांनी केली.

Exit mobile version