| उरण | वार्ताहर |
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला आहे. आता हा ध्वज उतरवताना काळजी घ्यावी,असे आवाहन मुख्याधिकारी संतोष माळी यांनी केले आहे. ध्वज संहितेतल्या नियम 2.2 नुसार, कापडी राष्ट्रध्वज खराब झाल्यास किंवा त्याचा रंग फिका झाल्यास तो वापरणं टाळावं. असं न केल्यास तो तिरंग्याचा अपमान समजला जातो. अशा वेळी खराब झालेल्या राष्ट्रध्वजास वेगळ्या जागी नेऊन पूर्णपणे नष्ट करणं गरजेचं आहे. ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करून ठेवावा, ध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ नये, ध्वज फाटेल अशा पद्धतीने तो फडकवू नये, अथवा बांधू नये, राष्ट्रध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी किंवा अन्य कारणासाठी करू नये, अभियान कालावधीनंतर झेंडा फेकू नये. तो सन्मानाने जतन करावा. असा पालिकेने दिला सल्ला हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गंत देण्यात आलेले राष्ट्रध्वज हे अभियान संपल्यानंतर नागरिक त्यांच्या घरी जतन करुन ठेवू शकतात. या मोहिमेची एक आठवण म्हणून नागरिक तिरंगा घरीच जपून ठेवू शकतात. व पुढील वर्षी हाच तिरंगा पुन्हा वापरु शकतात, असा सल्ला उरण पालिकेने दिला आहे.