। रसायनी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ईसालगड येथिल ईसालवाडी ही शाळा पट संख्या अभावी बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरु करुन तेथील मुलांच्या शिक्षणाची सोय सरकारने करावी यासाठी ग्रामस्थांनी गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र आज त्या वाडीतील 16 ते 18 मुले असून शिक्षणांपासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने तसा आदेश द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. येथील आदिवासी समाजाचा विचार केला जावा, शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी ग्रामस्थ आणी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून गट शिक्षणाधिकारी चोरमले यांना निवेदन देण्यात आले.यावेळी कमल भस्मा, कमळू पारधी, जैतु पारधी, बुध्या पारधी, बामा पारधी, रमेश भवर, प्रविण पारधी, यशवंत दोरे, पांडुरंग पारधी, जैतु पारधी, जितेंद्र ठाकूर,विस्तार अधिकारी पाडवी,पालवे संदीप सुर्वे, बस्वराज स्वामी, दिपक ठाकूर, अमित मिडगुले, विश्वास सावळे, प्रदिप गोंधळी, शैलेंद्र तांडेल उपस्थित होते.